बारामती परिसरातून कल्याण-ठाणे-मुंबईला जाणारे कित्येक गोरगरीब प्रवासी भल्या-पहाटे घर सोडतात आणि एसटी / रिक्षा / टमटम / वडाप / जीप अशा मिळेल त्या
वाहनाने बारामती रेल्वे स्थानक गाठतात. लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट घेतात आणि डेमूतून पुण्यात येतात आणि येथे कर्जत पॅसेंजरमध्ये बसतात. पुढे कर्जतला मुंबई लोकलमध्ये बसून मुंबईकडे जातात.
बारामातीहून मुंबईला थेट एसटी बस असताना देखील आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने ते रेल्वेने असा प्रवास करतात. कर्जत पॅसेंजर म्हणजे या गोरगरीब लोकांसाठी वरदानच आहे.
....
more...
परंतु ताज्या बातमीनुसार पुणे-कर्जत पॅसेंजरची वेळ बदलल्याने आता बारामतीहून पुण्याला आल्यावर त्यांना कर्जत पॅसेंजर मिळणार नाही. आता त्यांना जास्त पैसे देऊन
इतर गाड्यांनी मुंबईकडे प्रवास करावा लागेल ही अत्यंत दुःखद बातमी आहे.